किमान तापमान : 29.3° C
कमाल तापमान : 29.76° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 83 %
वायू वेग : 6.9 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.76° C
28.15°C - 29.99°C
26.38°C - 28.42°C
26.71°C - 27.46°C
27.64°C - 28.22°C
27.47°C - 27.97°C
27.81°C - 28.7°C
भुवनेश्वर, (११ जुन) – ओडिशात २४ वर्षांनंतर सत्ताबदल झाला आहे. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. मोहन चरण माळी यांची राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे ओडिशातही दोन उपमुख्यमंत्री असतील. ओडिशाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये पार्वती परिदा नावाची एक महिला आहे. याशिवाय कनक वर्धन सिंह देव हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. जाणून घेऊया कोण आहे पार्वती परिदा?
पार्वती परिदा बद्दल
१९६७ मध्ये जन्मलेल्या पार्वती परिदा पुरीच्या निमापारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी बिजू जनता दलाचे (बीजेडी) दिलीप कुमार नायक यांचा ४,५८८ मतांनी पराभव केला. पार्वती परिदा (५७) या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी उत्कल विद्यापीठातून १९९५ मध्ये एलएलबी आणि २००५ मध्ये याच विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात एमएची पदवी मिळवली. त्याच वर्षी ओडिशा उच्च न्यायालयात त्यांनी काही काळ वकील म्हणून काम केले. त्यांचा विवाह माजी सरकारी कर्मचारी श्याम सुंदर नायक यांच्याशी झाला आहे. पार्वती परिदा यांचे पती सरकारी अधिकारी होते, ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवती परिदा यांची एकूण संपत्ती ३.६ कोटी रुपये आहे. प्रवती परिदा यांनी एकूण ३१.८ लाख रुपये उत्पन्न घोषित केले आहे, त्यापैकी ९ लाख रुपये त्यांची स्वतःची कमाई आहे.
भाजपने ७८ जागा जिंकल्या
ओडिशा विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये भाजपने ४०.०७ टक्के मतांसह १४७ पैकी ७८ जागा जिंकल्या. त्याचवेळी बीजेडीला ५१, काँग्रेसला १४ आणि इतरांना ४ जागा मिळाल्या. २०१९, २०१४ आणि २००९ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने २३, १० आणि ६ जागा जिंकल्या होत्या. यापूर्वी, २००० आणि २००४ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (बीजेडी) सोबत युती केली होती. २००० आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अनुक्रमे ३८ आणि ३२ जागा जिंकल्या.
पार्वती या पुन्हा मैदानात उतरल्या
१८ व्या लोकसभा निवडणुकीसह झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा पुरी जिल्ह्यातील निमापारा मतदारसंघातून पार्वती परिदा यांना उमेदवारी दिली. यावेळी त्यांच्यासमोर बीजेडीचे दिलीपकुमार नायक होते. याआधी बीजेडीचे समीर रंजन दश यांनी सलग तीन वेळा ही जागा जिंकली आहे. समीर रंजन दाश यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पार्वती परिदा यांचा अनुक्रमे २९,६३७ आणि ३२,००८ मतांनी पराभव केला होता.