|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.72° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 5.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 31.5°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.24°C - 30.77°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.46°C - 30.08°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.57°C - 30.43°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.51°C - 30.58°C

light rain
Home » आसाम-ईशान्य भारत, राज्य » सिक्कीमला पुराचा तडाखा; २५००० लोक बाधित

सिक्कीमला पुराचा तडाखा; २५००० लोक बाधित

– पंतप्रधानांनी दिले मदतीचे आश्वासन,
-१२०० घरे वाहून गेली, – मृत्युसंख्या ४१,
गंगटोक, (०७ ऑक्टोबर) – सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुराचा तडाखा बसल्यामुळे सुमारे २५००० लोक बाधित झाले असून, आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १२०० घरे वाहून गेली. तर २२ लष्करी जवानांसह १०३ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ढिगारा आणि चिखलात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव पथके कार्यरत आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
सिक्कीममध्ये आतापर्यंत १९ मृतदेह सापडले आहेत. याशिवाय पुरामुळे अनेक जण वाहून गेल्याने उत्तर बंगाल भागात जिल्ह्यांमध्ये २२ मृतदेह सापडल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे, असे सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. एस. तमांग यांनी सांगितले. सध्या बचावलेल्या २६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सुमारे १५०० लोक मदत शिबिरात आहेत. सिक्कीममधील पुराचा फटका भारतीय लष्कराच्या जवानांनाही बसला आहे. तिस्ता बॅरेजच्या खालच्या भागात बेपत्ता झालेल्या सैन्य दलातील सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर १५ सैनिकांचा अद्याप शोध सुरू आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथे लष्कराकडून बचावकार्य राबवले जात आहे. तिरंगा माऊंटन रेस्क्यू (टीएमआर), लष्कराशी संबंधित संस्था, श्वानपथक आणि विशेष रडारची अतिरिक्त चमू शोधमोहिमेत मदत करण्यात गुंतले आहेत.
बाधित भागात मदत पोहोचविणे सुरू
संरक्षण व गृह मंत्रालयाचे अधिकारी बचावकार्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकार्यांच्या सतत संपर्कात आहेत. राज्याच्या यंत्रणेशीही संपर्क सुरू आहे. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांची डागडुजी करून रस्ते लवकरात लवकर खुले करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या माध्यमातून बाधित भागात मदत साहित्य पोहोचवले जात आहे. पुरामुळे शाळा, महाविद्यालये १५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील, असे मु‘यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सांगितले.

 

 

 

Posted by : | on : 7 Oct 2023
Filed under : आसाम-ईशान्य भारत, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g