किमान तापमान : 30.66° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 84 %
वायू वेग : 2.37 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.93°C - 32.88°C
sky is clear29.31°C - 30.91°C
few clouds28.94°C - 30.47°C
few clouds29.19°C - 30.48°C
sky is clear28.89°C - 29.89°C
sky is clear28.94°C - 29.98°C
broken cloudsनवी दिल्ली, (२३ मे) – कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील यांनी सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सिद्धरामय्याच पाच वर्षे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील. पाटील म्हणाले की, अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला काँग्रेस हायकमांडने ठरवलेला नाही. शनिवारी सिद्धरामय्या आणि डीके यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एम.बी.पाटील म्हणाले की, आमच्या माहितीनुसार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात पक्षाच्या हायकमांडमध्ये सत्तावाटपाचा कोणताही करार झालेला नाही. जर अशी योजना असती तर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ती नक्कीच आमच्याशी शेअर केली असती. पण तसं काही नाही. पाटील म्हणाले की, सिद्धरामय्या पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. शपथविधीपूर्वी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांचा कार्यकाळ प्रत्येकी अडीच वर्षांचा असेल असे बोलले जात होते. सिद्धरामय्या हे पहिले २.५ वर्षे मुख्यमंत्री असतील. यानंतर डीके शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवण्यात येणार आहे. मात्र, पक्षप्रमुखांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोघांमध्ये बरीच अनिश्चितता निर्माण झाली होती.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बर्याच वाटाघाटीनंतर दोघांमध्ये एक करार झाला. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. हा प्रश्न सोडवण्यासाठी सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागला. सोनिया गांधींनी सांगितल्यानंतर डीके दोन नंबरच्या पदासाठी राजी झाले आणि सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कर्नाटकात १० मे रोजी मतदान झाले होते. १३ मे रोजी निकाल जाहीर झाला, त्यात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला. काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा जिंकल्या. तर भाजपला ६६ जागांवर समाधान मानावे लागले.