किमान तापमान : 29.53° C
कमाल तापमान : 29.84° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.84° C
27.4°C - 30.64°C
scattered clouds27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clearनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये प्रकृती आणि वाढत्या वयाचा दाखला देत त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, रायबरेलीशी असलेले घनिष्ठ नाते सांगून त्यांनी भविष्यातही कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गांधी घराण्यातील कोणीतरी रायबरेलीतून निवडणूक लढवणार हे त्यांच्या आवाहनावरून स्पष्ट झाले आहे.
सोनिया गांधींनी पत्रात लिहिले आहे की, दिल्लीत माझे कुटुंब अपूर्ण आहे. रायबरेलीला येऊन आणि तुम्हा भेटून हे नात पूर्ण होते. हे जवळचे नाते खूप जुने आहे आणि मला ते माझ्या सासरच्या मंडळींकडून मिळाले आहे. रायबरेलीशी आमच्या कौटुंबिक संबंधांची मुळे खोलवर आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझे सासरे फिरोज गांधी यांना येथून विजयी करून दिल्लीला पाठवले. त्यांच्यानंतर तुम्ही माझ्या सासू इंदिरा गांधींना आपलेसे केले. तेव्हापासून आजतागायत ही मालिका आयुष्यातील चढ-उतार आणि खडतर वाटेवरून प्रेमाने आणि उत्साहाने सुरू राहिली आहे आणि आमचा त्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
तू मलाही या उज्वल वाटेवर चालायला जागा दिलीस. माझी सासू आणि माझा जीवनसाथी कायमचा गमावल्यानंतर मी तुझ्याकडे आले आणि तू माझ्यासाठी हात पसरलास. मागच्या दोन निवडणुकांत खडकाप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात, हे मी कधीच विसरू शकत नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे आणि या विश्वासावर कायम राहण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आता प्रकृती आणि वाढत्या वयामुळे मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्या म्हणाल्या. या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील हे निश्चित. मला माहीत आहे की आजवर जशी तुम्ही माझी काळजी घेत आलात तशीच प्रत्येक अडचणीत तुम्ही माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घ्याल. यावेळी लवकरच भेटण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.