किमान तापमान : 29.59° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 5.39 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
28.55°C - 31.99°C
overcast clouds28.21°C - 30.3°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rain– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा,
नवी दिल्ली, (०९ फेब्रुवारी) – हरित क्रांतीचे जनक डॉ. एमएस स्वामीनाथन, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली. पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. हा सन्मान देशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाला समर्पित असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एकाच दिवसात देशातील तीन व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रात भारताला स्वावलंबी करणारे स्वामीनाथन
देशातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारत सरकार आपल्या देशातील कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. एमएस स्वामीनाथन जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करत आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
चरण सिंह यांच्या वचनबद्धतेने प्रेरित झालेला देश
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे, असे नरेंद्र मोदींनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो वा देशाचे गृहमंत्री असो आणि आमदार असतानाही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली, असेही त्यांनी लिहिले आहे. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.
नरसिंह राव यांनी देशाची सेवा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पुढील पोस्टमध्ये लिहिले की नरसिंह राव यांनी एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. नरसिंह राव यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ महत्त्वाच्या उपाययोजनांसाठी स्मरणात राहील, असेही पंतप्रधानांनी लिहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारत जागतिक बाजारपेठांसाठी खुला झाला, ज्यामुळे आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू झाले.