|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.3° C

कमाल तापमान : 30.09° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.74 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.09° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.92°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.45°C - 30.7°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.88°C - 30.38°C

light rain

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक=सर्व जागा महायुतीलाच मिळणार= मुंबई, [८ जानेवारी] – पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशीष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने आणि विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने गुरुवारी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. सत्ताधारी भाजपा-शिवसेनेकडे दोन्ही पक्षांचे मिळून १८५ आणि किमान दहा अपक्ष असे मोठे संख्याबळ असल्याने चारही जागांवर युतीचेच उमेदवार सहज निवडून येऊ...9 Jan 2015 / No Comment /

धनगर आरक्षणास विरोध नाही

धनगर आरक्षणास विरोध नाही=आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची स्पष्टोक्ती= नाशिक, [८ जानेवारी] – धनगर समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आदिवासींसाठी असलेल्या सात टक्के आरक्षाणास धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी आम्ही कदापी सहन करणार नसल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. भाजपा आदिवासी प्रदेश आघाडीतर्फे रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये आयोजित सदस्य नोंदणी कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. पदाधिकार्‍यांची राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे....9 Jan 2015 / No Comment /

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार=नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निर्धार= मुंबई, [८ जानेवारी] – भारतीय जनता पार्टीचे काम राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य नोंदविण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्‍वास भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केला. महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे गुरुवारी प्रथमच मुंबईत आगमन झाले. प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...9 Jan 2015 / No Comment /

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [५ जानेवारी] – वेगवेगळ्या कारणांसाठी राजकीय व सामाजिक आंदोलने केल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले व प्रलंबित असलेले सर्व खटले मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे अशाप्रकारचे सर्व खटले मागे घेण्यात येणार आहेत. राजकीय व सामाजिक आंदोलनांमध्ये १ मे २००५ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले खटले ७ जुलै २०१० च्या शासन निर्णयान्वये मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच...6 Jan 2015 / No Comment /

एलबीटी लवकरच रद्द होणार

एलबीटी लवकरच रद्द होणार=मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती= कोल्हापूर, [३ जानेवारी] – स्थानिक स्वराज संस्था कर अर्थातच एलबीटी रद्द करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे दिली. पूर्वीच्या कॉंगे्रस आघाडी सरकारने जकातीला पर्याय म्हणून राज्यात एलबीटी लागू केला होता. पण, व्यापार्‍यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला. एलबीटी रद्द करण्याबाबत आपल्याला सखोल विचार करावा लागणार आहे. ठोस पर्याय आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने आपले सरकार...4 Jan 2015 / No Comment /

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडियावर्धा, [२५ डिसेंबर] – मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा अर्थ आजचे मुस्लिम वा ख्रिश्‍चन आमचेच वंशज आहेत. दुर्दैवाने आज धर्मांतरण वाढत आहे. मात्र, आम्ही पुन्हा धर्मांतरण होऊ देणार नाही. हिंदूंना सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान मिळावा, यासाठी भारत एक घटनात्मक हिंदूराष्ट्र बनावे आणि हिंदूराष्ट्राच्या आधारावरच शासन असावे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले....26 Dec 2014 / No Comment /

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे. मनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत भाजपाचे राष्ट्रीय...24 Dec 2014 / No Comment /

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्कालामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक...20 Dec 2014 / No Comment /

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे. के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज...12 Dec 2014 / No Comment /

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा=शेतकर्‍यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ= नागपूर, [८ डिसेंबर] – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणार्‍या कॉंग्रेसने सोमवारी विधानसभेवर काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा पूर्णत: फसला. शेतकर्‍यांचे हित साधण्याचा आव आणणार्‍या कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक जमवता आल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कॉंग्रेसला इतके वाईट दिवस का आले? असा प्रश्‍न पोलिसांना देखील पडला होता. चार दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वार्तापरिषद घेऊन मोर्चात...9 Dec 2014 / No Comment /

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिका

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिकामुंबई, [९ नोव्हेंबर] – पुढच्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भरणार्‍या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी म्हणजे २००३च्या कुंभमेळाव्यात योजनेचा अभाव आणि पुरेशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे २९ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता, तर ११८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमांना...10 Nov 2014 / No Comment /

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी=सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार= नागपूर, [९ नोव्हेंबर] – कालपर्यंत महाराष्ट्राच्या केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची आणि त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील वनपर्यटन अधिक विकसित करण्याची घोषणा राज्याचे नवनियुक्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. रविवारी नागपुरातील भाजपा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अर्थमंत्री या नात्याने बोलताना सुधीर...10 Nov 2014 / No Comment /