Posted by वृत्तभारती
Saturday, November 8th, 2014
=खासदार आदर्श ग्राम योजना= नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे. उमरेड मार्गावरील या गावाचा या योजनेंतर्गत २०१६ पर्यंत सर्वांगीण विकास केला जाणार आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. देशातील प्रत्येक...
8 Nov 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 21st, 2014
=मुलींनी राखला वडिलांचा गड= मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या फरकाने जिंकली आहे. पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेची जागा लढविली. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उभा असलेला आपला चुलत भाऊ...
21 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, October 18th, 2014
चंद्रपूर, [१६ ऑक्टोबर] – घरातील महिला सजग असेल, तर कुटुंबात आणि आपल्या शेजारील घरांमध्ये चांगले परिवर्तन घडू शकते, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. येथील मैत्रीय छात्रावासाला शांताक्का यांनी भेट दिली, त्यावेळी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाहिका सुलभा गौड, सहकार्यवाहिका अंचल देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी शांताक्का यांनी छात्रावासामधील सेविकांशी चर्चा केली. आजची परिस्थिती बघता मी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी काय,...
18 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 15th, 2014
परभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे मनसे उमेदवाराने स्पष्ट केले आहे. मनसेचे परभणीचे उमेदवार विनोद दुधगावकर शिवसेना कार्यालयात पोहोचताच सर्वजण अवाक् झाले. आपण शिवसेना उमेदवार डॉ....
15 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, October 13th, 2014
=राज ठाकरेंचा हल्लाबोल= नाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात आबांची खिल्ली उडविली. महाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री. सत्तेचा माज आलेल्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का? असा सवाल करतानाच या निवडणुकीत...
13 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, October 13th, 2014
लातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण सुरू करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लातूर येथे भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी व उदगीर येथे भाजपा उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार आ. सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, खा. सुनील गायकवाड, रूपाताई पाटील...
13 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 8th, 2014
नागपूर, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कवर आयोजित विराट जाहीर सभेत प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे कौतुकोद्गार काढत असताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते आणि अतिशय विनम्रपणे जनसमुदायाला अभिवादन करत याचा स्वीकार करत होते. आ. फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील उमेदवारही आहेत. देवेंद्र फडणवीस अतिशय...
8 Oct 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 30th, 2014
नाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. विधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘अकार्यक्षम प्रशासक’ असा उल्लेख करून नितीन गडकरी...
30 Sep 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, September 27th, 2014
नागपूर, [२६ सप्टेंबर] – राज्यात निर्माण झालेल्या निराळ्या स्थितीचा विचार करता, भाजपा व सहकारी घटकपक्ष यांच्या भाजपा महायुतीच्या माध्यमातून येती विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र भाजपा महायुतीच्याच बाजूने वातावरण दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत मिळेल व ती सत्तास्थानी विराजमान होईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर सिव्हिल लाईन येथील प्रचार कार्यालयात शुक्रवारी...
27 Sep 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 16th, 2014
=मुलाखती अर्धवट सोडून परतले हॉटेलात= औरंगाबाद, [१५ सप्टेंबर] – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागले. यामुळे मुलाखती थांबवून राज ठाकरे विश्रांतीसाठी हॉटेलात निघून गेले. यामुळे आज आणि उद्याच्या मुलाखती होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. मराठवड्यातील विधानसभेच्या ४६ जागांसाठी आज राज ठाकरे इच्छूकांच्या मुलाखती घेत होते. जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी ९ वाजतापासून मुलाखतींना...
16 Sep 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, August 31st, 2014
=पंकजा मुंडे यांचे आवाहन, वाशीम शहरात जल्लोषात स्वागत= वाशीम, [३० ऑगस्ट] – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवून केंद्रातील भ्रष्ट कॉंग्रेस आघाडी सरकार उलथवून टाकले. त्याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी भ्रष्ट कॉंग्रेस – राकॉं आघाडीचे सरकार महाराष्ट्रातून घालवण्यासाठी जिद्दीने...
31 Aug 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, August 23rd, 2014
=आखाडा परिषदेची घोषणा= अयोध्या, [२२ ऑगस्ट] – महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी घोषणा अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमाग गढी मंदिराचे मुख्य पुजारी आणि आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञान दास यांनी आज केली. कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखाही महंत ज्ञान दास यांनी जाहीर केल्या. नाशिक येथील कुंभमेळा पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल आणि २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर २०१५ रोजी...
23 Aug 2014 / No Comment /