किमान तापमान : 28.15° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 5.16 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
26.59°C - 30.99°C
broken clouds26.4°C - 29.57°C
few clouds26.26°C - 28.74°C
few clouds25.44°C - 28.53°C
sky is clear25.35°C - 28.88°C
sky is clear25.62°C - 29.09°C
scattered cloudsनवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – राजधानीच्या सर्वांगीण विकासाकरीता दिल्लीतील जनता भाजपालाच मतदान करेल, असा विश्वास भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी व्यक्त केला आहे. मी स्वत: आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दोन नेत्यांना एकाचवेळी निवडून देण्याची संधी दिल्लीकरांना प्राप्त झाली असून, त्यांनी याचा फायदा घ्यावा, असे किरण बेदी यांनी स्वत: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे, असे त्या म्हणाल्या. मला विजयाची खात्री आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहे व जनतेशी जोडलेली आहे. केजरीवाल दिल्लीचे नाहीत, ते गाझियाबादला राहतात, असा टोलाही बेदी यांनी लगावला.
Short URL : https://vrittabharati.in/?p=20392