|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.61° C

कमाल तापमान : 31.86° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 49 %

वायू वेग : 4.83 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.86° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.21°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.5°C - 30.71°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.95°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.07°C - 31.81°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.96°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.5°C - 30.19°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » तामिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’राज

तामिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’राज

=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष=
Jayalalitha J.चेन्नई, [२३ मे] – बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता आज शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित एका शानदार समारंभात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सुरू असताना संपूर्ण तामिळनाडूत अण्णाद्रमुक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड जल्लोष करीत होते.
जयललिता यांच्यासोबतच २८ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललितांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्याने सभागृहात उपस्थितांमध्ये आगळाच उत्साह होता. जयललिता यादेखील जुन्या काळातील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
शुक्रवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी जयललिता यांची एकमताने निवड झाल्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम् यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जयललिता यांनी राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा सादर केला. शनिवारी सकाळी अकरा वाजता तामिळनाडूत पुन्हा एकदा ‘अम्मा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जयललितांच्या सत्तायुगाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, जयललिता यांचे मद्रात विद्यापीठ परिसरात आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव नंदेसिकन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वी त्यांनी पन्नीरसेल्वम् आणि शपथ घेणार असलेल्या अन्य मंत्र्यांची ओळख करून दिली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर केले.
बेहिशेबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटी रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी दोषी ठरविण्याच्या आणि शिक्षेच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या ११ मे रोजी उच्च न्यायालयाने त्यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले होते.

Posted by : | on : 24 May 2015
Filed under : ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g