किमान तापमान : 30.86° C
कमाल तापमान : 30.95° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.95° C
30.1°C - 32.95°C
sky is clear29.22°C - 32.92°C
few clouds28.74°C - 32.24°C
sky is clear28°C - 30.52°C
sky is clear27.57°C - 30.43°C
sky is clear27.44°C - 30.2°C
sky is clearशिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय,
मुंबई, (३१ जानेवारी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यगीताबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ निर्णय घेण्यात आले. यात ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ यावर राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याचे एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने राज्यांना सुचवले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यातील ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. या गीताचे गीतकार राजा बढे आहेत. गायक शाहीर साबळे असून, संगीतकार श्रीनिवास खळे आहेत.
राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’
राष्ट्रगीतानंतर आता राज्यात हे राज्यगीत गायिले जाणार आहे. विधानभवनात सुद्धा ‘वंदे मातरम्’ नंतर ‘गर्जा महाराष्ट गीत’ म्हटले जावे, यासाठी आम्ही विनंती करणार आहोत, अशी माहिती बैठकीनंतर सुधीर मनगंटीवार यांनी दिली.