किमान तापमान : 29.15° C
कमाल तापमान : 29.48° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 3.65 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.15° C
28.85°C - 30.59°C
sky is clear28.09°C - 30.43°C
sky is clear27.96°C - 30.27°C
sky is clear27.6°C - 29.85°C
sky is clear27.94°C - 30.15°C
few clouds27.93°C - 29.93°C
few clouds– भाजप अध्यक्षांविरोधात दिले वक्तव्य, खटला संपवण्याची याचिका फेटाळली,
रांची, (२३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. २०१८ मध्ये भाजप अध्यक्षांविरोधातील त्यांच्या वक्तव्याबाबत खटला संपवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. दिवाणी न्यायालयाकडून समन्स प्राप्त झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा खटला संपवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
रांची दिवाणी न्यायालयाने समन्स बजावले होते
वास्तविक, राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. यासंदर्भात रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू होता. दिवाणी न्यायालयाकडून समन्स मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी रांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण तिथेही त्याची निराशा झाली. रांची उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली आहे.
२०१८ मध्ये राहुल गांधींनी अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे राहुलवर मानहानीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.