|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.61° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.09 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.39°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.45°C - 30.7°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.88°C - 30.38°C

light rain
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » भारतात आज प्रचंड क्षमता; विश्वगुरू होण्यास परिस्थिती अनुकूल

भारतात आज प्रचंड क्षमता; विश्वगुरू होण्यास परिस्थिती अनुकूल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
मुंबई, (५ फेब्रुवारी ) – भारतात आज प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ देशाकडे उपलब्ध आहे. विश्वगुरू होण्यासाठी संपूर्ण अनुकूल परिस्थिती आहे. संत शिरोमणी रोहिदास यांच्या समरसतेच्या तत्त्वांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी पार पडलेल्या संत शिरोमणी रोहिदास जयंती सोहळ्यात ते बोलत होते. रोहिदास समाज पंचायत संघ, विभाग समिती क्रमांक ५, वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत रोहिदास यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. भारत आज जी प्रगती करीत आहे, त्याचा मूळ आराखडा भारतीय संत परंपरेत आहे. संत रोहिदास हे त्याचाच एक भाग आहेत. त्यांचे काम आणि त्यांच्या कामाचा परिणाम पाहूनच समकालीन संतांनी त्यांना संत शिरोमणी ही उपाधी दिल्याचे सरसंघचालक म्हणाले.
अर्थार्जनाच्या अट्टाहासातून रूढींच्या चौकटी निर्माण झाल्या. त्यातून जाचक व्यवस्था निर्माण झाली. त्यातून आत्मीयतेचा बळी गेला आणि परकीयांना आपले तुकडे करून खाण्याची संधी मिळाली. इस्लामी आक्रमणानंतर स्थिती आणखी बदलली. आधी केवळ लुटीसाठी आक्रमणे होत. नंतर आपली व्यवस्थाच मुळापासून बदलणारे आक्रमण झाले, असे ते म्हणाले. संत रोहिदास यांनी सत्याची प्रचीती घेतली. सत्याचा शोध हाच त्यांचा ध्यास होता. ज्येष्ठ-कनिष्ठ हा विचारच चूक आहे, हा विचार त्यांनी ठासून मांडला. सत्य, करुणा, अंतर्बाह्य पवित्रता आणि सतत परिश्रम हाच धर्म रोहिदासांनी सांगितला. परंपरेतून आलेले काय टिकावे आणि काय टाकावे, याचे भान त्यांना होते. त्यांच्या आध्यात्मिक शक्तीमुळेच प्रतिष्ठित लोक संत रोहिदासांचे शिष्य बनल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.
समरसता पोटातून यायला हवी
समरसता हा उन्नत समाजाचा पाया आहे. समरसता आज ओठात दिसते. ती पोटातून आली पाहिजे, तसा प्रयत्न करूया. एकेका प्रसंगात संत रोहिदास कसे वागले, त्याचा अभ्यास आणि आचरण करूया आणि देशाची प्रगती करूया, असे सरसंघचालक शेवटी म्हणाले.

Posted by : | on : 6 Feb 2023
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g