किमान तापमान : 28.98° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.84 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.55°C - 31.47°C
overcast clouds28.21°C - 30.54°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rain– ओम बिर्ला यांचे प्रतिपादन,
राजगढ, (२८ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत बदलत आहे आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली होत आहे. या परिवर्तनात प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केले.
रायपूर येथे अग्रवाल समाजाने उभारलेल्या ‘अग्रोह धाम’ या समाज मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते संबोधित करीत होते. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आज देश बदलत आहेत. भारत आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली होत आहे. या आर्थिक परिवर्तनासाठी आपणही हातभार लावला पाहिजे. आपले युवा उद्योजक म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत अर्थव्यवस्थेला मजबूत करू शकतात, असे बिर्ला यांनी सांगितले. समाजाला सरकारसह एकत्रितपणे काम करावे लागेल आणि म्हणूनच पंतप्रधान म्हणाले की, जर १४० कोटी लोकांनी एकत्र काम केले तर, आम्ही भारताला विकसित देश बनवण्याचे व्रत पूर्ण करू शकू, असे बिर्ला म्हणाले. अग्रवाल समाजाने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर समुदायाच्या सदस्यांनी कारखाने टाकले आणि हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती केली, असे बिर्ला यांनी सांगितले.