किमान तापमान : 29.37° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.74°C - 30.56°C
sky is clear28.15°C - 30.49°C
sky is clear28°C - 30.33°C
sky is clear27.64°C - 29.82°C
sky is clear27.9°C - 30.46°C
sky is clear28.28°C - 30.44°C
broken cloudsनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – संरक्षण मंत्रालयाने अलीकडे दोन करारांना अंतिम रूप दिले आहे, एक मेसर्स ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड आणि दुसरा मेसर्स बीईएमएल लिमिटेड सोबत, लष्करी उपकरणांच्या खरेदीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते.
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडसोबतच्या ४७३ कोटी रुपयांच्या करारामध्ये ६९७ बोगी ओपन मिलिटरी (बीओएम) वॅगन्सचे अधिग्रहण समाविष्ट आहे. यासह, ५६ मेकॅनिकल माइनफिल्ड मार्किंग इक्विपमेंट (एमएमएमई) मार्क खख च्या खरेदीसाठी बीईएमएल लिमिटेडसोबत ३२९ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बाय (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत स्वाक्षरी केलेले हे करार आत्मनिर्भर भारतच्या व्हिजनच्या अनुषंगाने स्वदेशी उत्पादन आणि संरक्षण उत्पादनामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाची वचनबद्धता अधोरेखित करतात.
रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) द्वारे डिझाइन केलेले बीओएम वॅगन्स, भारतीय लष्कराच्या युनिट्सच्या मनुष्यबळासाठी महत्त्वपूर्ण विशेष वॅगन्स म्हणून काम करतात. प्रामुख्याने हलकी वाहने, तोफखाना, बीएमपी आणि अभियांत्रिकी उपकरणे शांतता काळातील ठिकाणाहून कार्यान्वित क्षेत्रापर्यंत नेण्यासाठी वापरली जातात, या वॅगन्स संघर्षाच्या वेळी युनिट्स आणि उपकरणे जलद आणि एकाच वेळी एकत्र करणे सुलभ करतात. करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शांततेच्या काळात वेगवेगळ्या स्थानकांमधील युनिट्सच्या हालचालींना देखील समर्थन देतात.
सर्व माइनफिल्ड्सचे चिन्हांकन अनिवार्य करणार्या ठराविक पारंपारिक शस्त्रास्त्रांवरील कन्व्हेन्शनमधील सुधारित प्रोटोकॉल-खख चे पालन करून, एमएमएमई मार्क खख करार या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करतो. एमएमएमई, संपूर्ण स्टोअर्ससह क्रॉस-कंट्री ऑपरेशनसाठी डिझाइन केलेले, कमीतकमी वेळ आणि मनुष्यबळासह, माइनफिल्ड चिन्हांकित करण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करते. प्रगत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमसह इन-सर्व्हिस हाय मोबिलिटी व्हेईकलचा वापर करून, एमएमएमई भारतीय सैन्याची ऑपरेशनल क्षमता वाढवते. हे खरेदी उपक्रम केवळ देशाची संरक्षण क्षमता मजबूत करत नाहीत तर आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने आत्मनिर्भरतेला चालना देत स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देतात.