किमान तापमान : 29.91° C
कमाल तापमान : 30.63° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 82 %
वायू वेग : 1.91 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.63° C
29.3°C - 32.1°C
sky is clear29.07°C - 31.09°C
sky is clear28.86°C - 31.57°C
sky is clear28.96°C - 30.89°C
sky is clear28.63°C - 30.54°C
few clouds28.73°C - 30.58°C
broken clouds– भारतातील वाढते ’हिंदुत्व’ धार्मिक सलोखा, शांततेसाठी गंभीर धोका आहे,
इस्लामाबाद, (२३ जानेवारी) – २२ जानेवारी हा दिवस भारतासाठी प्रत्येक अर्थाने खास होता. उत्तर प्रदेशातील राम नगरी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एकीकडे अमेरिका, मेक्सिको आणि लंडनसारख्या देशांमध्ये भगवान रामाची पूजा करून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तान वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. पाकिस्तानने सोमवारी म्हटले की, ’भारतातील वाढती ’हिंदुत्व’ विचारसरणी धार्मिक सलोखा आणि प्रादेशिक शांततेसाठी गंभीर धोका आहे.’ याशिवाय पाकिस्तानने भारत सरकारला मुस्लिमांसह धार्मिक अल्पसंख्याक आणि त्यांच्या पवित्र स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाची (एफओ) ही टिप्पणी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या मंदिरातील रामलल्लाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेकनंतर आली. त्यात म्हटले आहे की, ’आजच्या अभिषेक सोहळ्याला कारणीभूत असलेल्या गेल्या ३१ वर्षांतील घटना भारतातील वाढत्या बहुसंख्यवादाचे द्योतक आहेत. भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उपेक्षित ठेवण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे, असे एफओने एका निवेदनात म्हटले आहे. उल्लेखनीय आहे की, २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देऊन राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने अयोध्येतील सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकरचा भूखंड देण्याचे निर्देशही केंद्राला दिले.