|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.32° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 49 %

वायू वेग : 5.84 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.14°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Home » मुंबई-कोकण » इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस

इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस

मुंबई, (२७ जुलै) – आर्थिक राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने देखील शहरात रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वृत्त आहे. येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने खबरदारीच्या दृष्टीने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या कुलाबाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद झाल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यापूर्वी हा विक्रम २०२० मध्ये नोंदवला गेला होता. त्यादरम्यान सांताक्रूझमध्ये १५०२ मिमी पाऊस झाला. २०२३ मध्ये, १ जुलै ते २६ जुलैच्या सकाळपर्यंत, हा आकडा १४३३ मिमीवर पोहोचला होता. गुरुवारी हा विक्रम १५५७.८ मिमीवर पोहोचताच मोडला.
मुंबईतील कुलाबा येथे २४ तासांत सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. यादरम्यान येथे २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून २२३.२ मिमी पाऊस पडला आहे. तर सांताक्रूझ येथे २४.४अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून १४५.१ मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत मुंबई आणि उपनगरी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, जो नंतर रेड अलर्टमध्ये वाढवण्यात आला. मुंबईतील मुसळधार पावसाने तलाव तुडुंब भरले असले तरी त्यामुळे मुंबईकरांची पाणीकपात किंवा पाणीकपातीचा प्रश्न लगेच सुटणार नाही. बुधवारपर्यंत शहरातील अनेक तलावांनी कमाल क्षमता गाठली होती. दरम्यान, सातही तलावांमधील एकूण साठा ७० टक्क्यांच्या पुढे जात नाही तोपर्यंत १० टक्के पाणीकपात सुरूच राहणार असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे. विहार आणि तानसा तलाव भरले आहेत.
दक्षिण मुंबईला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अनेक भागात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी सांगते. यामध्ये कुलाबा (२२३.२ मिमी), सांताक्रूझ (१४५.१ मिमी), वांद्रे (१०६ मिमी), राम मंदिर (१६१ मिमी), भायखळा (११९ मिमी), सीएसएमटी (१५३.५ मिमी) आणि सायन (११२ मिमी) यांचा समावेश आहे. याशिवाय दहिसरमध्ये ७०.५ मिमी, चेंबूरमध्ये ८६.५ आणि माटुंग्यात ७८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. त्याचवेळी, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानेही गुरुवारी होणार्‍या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. यासंदर्भात बुधवारी विद्यापीठ मंडळाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, सातारा शहराजवळील कण्हेर धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. सध्या धरण ५६ टक्के भरले असून जिल्हा प्रशासनही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज असल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर, कोल्हापूरला तूर्तास दिलासा मिळाला आहे. येथे पंचगंगा नदीची पाणीपातळीही सुमारे १० तास स्थिर आहे. रायगड आणि इतर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील रत्नागिरी, पुणे, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे.

Posted by : | on : 27 Jul 2023
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g