|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.61° C

कमाल तापमान : 30.2° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.09 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.2° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 31.5°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.3°C - 30.98°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.45°C - 30.7°C

light rain
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » एकतेशिवाय विकास शक्य नाही

एकतेशिवाय विकास शक्य नाही

डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ४ जुलै – देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. कलह नव्हे तर परस्पर संवाद हाच हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा होय, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे ‘हिंदुस्थानी प्रथम, हिंदुस्थान प्रथम’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे तत्कालीन सल्लागार डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या ‘द मीटिंग ऑफ माईंड’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
सरसंघचालक पुढे म्हणाले, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदू-मुस्लिम वेगळे नाही तर एकच आहेत. लोकांच्या उपासना पद्धतीबाबत भेदभाव करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशाला शक्तिशाली करण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी रा. स्व. संघ कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे म्हणून तिच्यावर हल्ला चढवणे, झुंडबळी हे प्रकार हिंदुविरोधी आहेत. जे लोक धर्माच्या नावाखाली झुंडबळीसारखे प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. आम्ही लोकशाहीवादी देशात राहातो. येथे हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. तेथे फक्त भारतीयांचे वर्चस्व असू शकते, असेही सरसंघचालक म्हणाले. स्वतःला हिंदू नाही तर भारतीय म्हणा. राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. परंतु, ते ऐक्य बिघडवण्याचे माध्यम बनू शकते. राष्ट्राचे हित हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 4 Jul 2021
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g