Posted by वृत्तभारती
Saturday, February 10th, 2024
– पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास, नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – अनेक पिढ्या ज्या कामांची वाट पाहात होत्या, ती सर्व कामे या लोकसभेच्या कार्यकाळात झाली. कलम ३७० हटवून संविधानातील आत्म्याचे प्रगटीकरण करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी देशाचे संविधान बनवले, त्यांचा आत्मा आम्हाला आशीर्वाद देत असेल. काश्मीरच्या लोकांना आतापर्यंत सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यांच्यापर्यंत आम्ही सामाजिक न्याय पोहोचवला. दहशतवादरूपी राक्षसाने या देशाची जमीन रक्तबंबाळ झाली होती. आम्ही दहशतवादाविरुद्ध अनेक...
10 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, February 10th, 2024
– मोदींचे १७व्या लोकसभेतील शेवटचे भाषण, नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – लोकसभेत शनिवारी नियम १९३ अन्वये ऐतिहासिक श्री राम मंदिराचे बांधकाम आणि श्री राम लाला यांचा अभिषेक या विषयावर चर्चा झाली. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांतील कामगिरीची माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबद्दल ते म्हणाले, तुमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तुमच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. काहीही झाले तरी तुमचे स्मित कधीही कमी होत नाही....
10 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
– विकसित भारताचे स्वप्न साकारले असेल, – गरीब पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला जाऊ नये, याला आमची प्राथमिकता, नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – देशातील गरीब जनतेच्या जीवनात सुधारणा करणे, ते परत गरिबीच्या खाईत लोटले जाणार नाहीत, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कुणी कितीही आक्षेप घेतला, तरी देशातील ८० कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देऊच, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आलेला असेल,...
7 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – आमचा तिसरा कार्यकाळ आता फार दूर नाही, या कार्यकाळातही देशाच्या विकासाची गती आम्ही कमी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी बोलत होते. देशात डॉक्टरांची आणि वैद्यकीय महाविद्यालयांची सं‘या वाढेल, गरिबांना पक्की घरे मिळतील, प्रत्येक घरात नळातून पाणी मिळेल. येत्या पाच वर्षांत बुलेट ट्रेनही धावताना दिसेल, असेही मोदी...
7 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
– काय आहे ‘श्वेत पत्र’?, नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यूपीए सरकारच्या आर्थिक गैरकारभारावर ‘श्वेतपत्रिका’ आणणार आहे. संसदेचे अधिवेशनही याच कारणासाठी एक दिवसाने वाढवण्यात आले आहे. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताची आर्थिक दुर्दशा आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे नकारात्मक परिणाम यूपीए सरकारच्या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर श्वेतपत्रिकेद्वारे तपशीलवार स्पष्ट केले जातील. त्या वेळी उचलल्या जाणाऱ्या सकारात्मक पावलांचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयीही यात चर्चा होईल....
7 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे संसद भवनात बोलत होते, त्यादरम्यान त्यांनी असे काही बोलले, जे ऐकून भाजप नेते खूश झाले तर खुद्द पंतप्रधान मोदीही हसायला लागले. भाजप नेते आता हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आधीच आनंद व्यक्त करत आहेत. मल्लिकार्जुन खरगे सभागृहात सरकारच्या उणिवा मोजत होते. महिला आरक्षण आदी विषयावर ते आपले विचार मांडत होते. दरम्यान ते तुम्ही...
2 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
– अंतरिम अर्थसंकल्पातून मदतीत मोठी कपात, नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – मालदीवच्या सुख-दुःखात भागीदार असलेला भारत त्याच्या कारवायांवर इतका नाराज झाला आहे की, आता केंद्र सरकारने मालेला देण्यात येणार्या आर्थिक मदतीत मोठी कपात केली आहे. सरकारने गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालदीवच्या मदतीत २२ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव आहे. भारत शेजारी देश मालदीवला त्याच्या गरजांसाठी आर्थिक मदत करीत असतो. मालदीवच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची...
2 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
– सहावा अर्थसंकल्प सादर करत निर्मला सीतारामन यांनी केली मनमोहन सिंग यांची बरोबरी, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. आपला सहावा अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारामन यांनी या बाबतीत माजी पंतप्रधानांची बरोबरी केली. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या नरसिंह...
1 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– बायोमेट्रिक आणि फोटो स्कॅन, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर सरकार आता पूर्णपणे सतर्क झाले आहे. आता येथे येणार्या लोकांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज पाहण्यासाठी संसदेत जाणार्यांना स्मार्ट कार्डद्वारेच प्रवेश मिळणार आहे. यासाठी या लोकांना त्यांचे बायोमेट्रिक ठसा आणि फोटो द्यावा लागेल. लोकांना आणि पाहुण्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिली जात आहेत. यासाठी प्रथम नोंदणी केली जात आहे, त्यानंतर एक फॉर्म भरला...
31 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – बुधवारी राज्यसभेत तीन नवीन सदस्यांनी शपथ घेतली. सतनाम सिंह संधू, नारायण दास गुप्ता आणि स्वाती मालीवाल यांनी बुधवारी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखर यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. मात्र, स्वाती मालीवाल यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली कारण त्यांच्या पहिल्या शपथेचा अध्यक्षांनी विचार केला नाही आणि त्यांनी पुन्हा त्यांचे नाव पुकारले. वास्तविक, त्यांनी शपथेचा भाग नसलेले काही शब्द वापरले होते. चंदिगड...
31 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला उल्लेख, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुधवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना भारतीय रेल्वेने गेल्या १० वर्षांत सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख केला. नमो भारत, अमृत भारत आणि वंदे भारत यांसारख्या नवीन ट्रेन्सचा संदर्भ देत मुर्मू म्हणाले की, देशात २५ हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत, जे अनेक विकसित देशांतील रेल्वे ट्रॅकच्या एकूण लांबीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रपती...
31 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ९ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे विद्यमान लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारला आपला नियमित अर्थसंकल्प यावेळी सादर करता येणार नाही. त्यामुळे जून महिन्यापर्यंतचा सरकार खर्च चालविण्यासाठी सरकार अंतिरम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती...
12 Jan 2024 / No Comment /