|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.34° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 79 %

वायू वेग : 4.2 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Monday, 13 May

29.65°C - 31.89°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.66°C - 32.03°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.59°C - 30.97°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

29.26°C - 32.45°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 17 May

26.52°C - 30.31°C

moderate rain
Weather Forecast for
Saturday, 18 May

28.65°C - 29.56°C

overcast clouds

तामिळनाडूत रालोआचेच सरकार येणार : अमित शाह

तामिळनाडूत रालोआचेच सरकार येणार : अमित शाहकन्याकुमारी, ७ मार्च – केवळ कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतच नव्हे, तर आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विजयी होईल, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी व्यक्त केला. ६ एप्रिल रोजी होणार्‍या कन्याकुमारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते. तामिळनाडूमध्ये भाजपा अण्णाद्रमुच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) एक भाग आहे आणि अण्णाद्रमुक पक्षाबरोबर जागावाटपाच्या कराराचा एक भाग म्हणून पक्ष कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघासाठी ६ एप्रिल...7 Mar 2021 / No Comment /

अण्णाद्रमुक-भाजपामध्ये जागावाटप निश्‍चित; मिळाले भाजपाला २० मतदारसंघ

अण्णाद्रमुक-भाजपामध्ये जागावाटप निश्‍चित; मिळाले भाजपाला २० मतदारसंघचेन्नई, ६ मार्च – तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक-भाजपामध्ये आज शनिवारी जागावाटप निश्‍चित करण्यात आले आहे. अण्णाद्रमुकने भाजपासाठी २० मतदारसंघ सोडले आहेत. हे जागावाटप निश्‍चित करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या काही फेर्‍या झाल्या होत्या. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांत जागावाटपासाठी चर्चा झाल्यानंतर अण्णाद्रमुकने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपाच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल, असे अण्णाद्रमुकने स्पष्ट केले असून, या जागावाटपाच्या करारावर सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या वतीने ओ....6 Mar 2021 / No Comment /

पुडुचेरीतील कॉंगे्रस सरकार कोसळले

पुडुचेरीतील कॉंगे्रस सरकार कोसळलेविश्‍वासमतापूर्वीच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, पुडुचेरी, २२ फेब्रुवारी – आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे अल्पमतात आलेले पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज सोमवारी विश्‍वासमताचा सामना करणयापूर्वी राजीनामा दिला. यामुळे या केंद्रशासित प्रदेशातील कॉंगे्रसचे सरकार कोसळले असून, तिथे आता राष्ट्रपती राजवट लागू होणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाही, याची माहिती असल्याने, विधानसभेत विश्‍वासमत सादर करण्यापूर्वीच नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन् यांची भेट घेतली आणि राजीनामा दिला....22 Feb 2021 / No Comment /

राजकीय प्रवेशासाठी दबावतंत्र नको : रजनीकांत

राजकीय प्रवेशासाठी दबावतंत्र नको : रजनीकांतचेन्नई, ११ जानेवारी – काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देत येत्या काळात सक्रिय राजकारणात न उतरण्याचा आपला मानस जाहीर केला होता. पण, तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात यावे, असा आग्रह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून धरण्यात आला. हा आग्रह इतका पराकोटीला पोहोचला की त्यांचे चाहते आणि समर्थकांनी यासाठी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे आंदोलनही केले. यानंतर अखेर संपूर्ण परिस्थिती पाहून खुद्द रजनीकांत यांनीच काहीशी नाराजी व्यक्त करत चाहत्यांना राजकीय प्रवेशासाठी...11 Jan 2021 / No Comment /

सक्रिय राजकारणात सध्याच प्रवेश नाही

सक्रिय राजकारणात सध्याच प्रवेश नाहीचेन्नई, २९ डिसेंबर – आपण सध्याच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आज मंगळवारी केली. वय आणि प्रकृती यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देताना, ३१ डिसेंबर रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला. मागील आठवड्यात रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले...30 Dec 2020 / No Comment /

बुरेवी चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेने

बुरेवी चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेनेचेन्नई, २ डिसेंबर – बुरेवी चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेने निघाले असून, कन्याकुमारी ते पंबान दरम्यान उद्या गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि केरळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुरेवी चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या तटवर्ती भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असून, ७० ते ९० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. रामनाथपूरम् ते कन्याकुमारी जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून...3 Dec 2020 / No Comment /

निवार चक्रीवादळची तामिळनाडू, पुडुचेरीला धडक

निवार चक्रीवादळची तामिळनाडू, पुडुचेरीला धडकचेन्नई, २६ नोव्हेंबर – ताशी १२० किलोमीटर वेग असलेले निवार चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास पुडुचेरीच्या किनारपट्टी भागात धडकले. यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली, त्याच्या प्रभावाने तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनार्‍यालगत असलेल्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. वादळामुळे आलेल्या वेगवान वार्‍यांमुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे या सर्वच भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या वादळाने दोन्ही राज्यांमध्ये पाच नागरिकांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले आहे. वार्‍यांचा...26 Nov 2020 / No Comment /

निवार चक्रीवादळ तामिळनाडू-पुडुचेरीच्या किनार्‍यावर धडकणार

निवार चक्रीवादळ तामिळनाडू-पुडुचेरीच्या किनार्‍यावर धडकणारहजारो लोकांना हलविले, चेन्नई, २५ नोव्हेंबर – बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्येला निर्माण झालेले निवार चक्रीवादळ अतिशय वेगाने तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनार्‍याकडे वाटचाल करीत असून, आज रात्री उशिरापर्यंत ते धडकणार आहे. या वादळाच्या प्रभावाने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सावधतेचा उपाय म्हणून आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या दोन्ही भागांमध्ये वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. आज बुधवारी रात्री हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या कराईकल आणि महाबलीपुरम्...25 Nov 2020 / No Comment /

तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरीमध्ये मतदान

तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरीमध्ये मतदानचेन्नई, [१६ मे] – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटच्या टप्पाला आज सुरूवात झाली आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होत आहे. सकाळी मतदाना सुरूवात झाली असून तामिळनाडूमध्ये २३४, केरळमध्ये १४० तर पुडुचेरीत ३० जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला उमेदवार रिंगणात आहेत. ५८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार असून तामिळनाडूत एकूण ६५,६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली...16 May 2016 / No Comment /

युती न होण्यास भाजपा जबाबदार : जयललिता

युती न होण्यास भाजपा जबाबदार : जयललिताचेन्नई, [३ एप्रिल] – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरिता माझ्या पक्षाने भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपानेच त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आता हा पक्ष निराश झाला असल्यानेच माझ्यावर निराधार आरोप करीत आहे, अशा शब्दात अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांनी हल्ला चढविला. निवडणुका जवळ आल्या असताना युती होऊ शकली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोईम्बतूर येथील सभेच्या काळात माझ्या सरकारवर टीका केली नव्हती. माझे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे,...4 Apr 2016 / No Comment /

भाजपा-बीडीजेएस यांच्यात युती

भाजपा-बीडीजेएस यांच्यात युतीथिरुवनंतपुरम्, [२१ मार्च] – नव्यानेच उदयाला आलेल्या भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) आणि भाजपा यांच्या युतीत झालेल्या समझोत्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत या नवोदित पक्षाला १४० पैकी ३७ जागा लढवता येणार आहेत. जागावाटपाकरिता दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बीडीजेएसला ३७ जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कुम्मनम् राजशेखरन् आणि बीडेजेएस अध्यक्ष तुषार वेलाप्पल्ली यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली. राजशेखरन् म्हणाले की, रालोआच्या राज्यसमितीची बैठक पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात...22 Mar 2016 / No Comment /

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य=मद्रास हायकोर्टाचा निर्वाळा= चेन्नई, [६ मार्च] – केवळ अनुदानित आणि शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही सकाळची प्रार्थना राष्ट्रगीतानेच सुरू करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणामकारक निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला. शासकीय शाळांची सुरुवात राष्ट्रगीतानेच होत असते. पण, खाजगी शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत म्हटले जाते की नाही, याची तपासणी करण्यात यावी. संबंधित राज्यांमधील शिक्षण विभाग आणि केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाने ही जबाबदारी पार पाडावी,...6 Mar 2016 / No Comment /