Posted by वृत्तभारती
Tuesday, July 27th, 2021
दोन दिवसांत मिळणार नवा मुख्यमंत्री, बंगळुरू, २६ जुलै – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सायंकाळी त्यांनी राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे सोपविला असून, येत्या दोन दिवसांतच नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे. मी आपला राजीनामा राज्यपालांना सोपविला आहे आणि तो मंजूर करण्याची विनंतीही केली आहे. नवे मुख्यमंत्री कोण असावे, याबाबतची कुठलीही शिफारस मी केलेली नाही, असे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. मी अजिबात दु:खी...
27 Jul 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, July 17th, 2021
नवी दिल्ली, १७ जुलै – माझ्या राजीनाम्याबाबत अफवा उडवण्यात आल्या, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज शनिवारी भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये पक्ष मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्याचा आदेश त्यांनी दिला, अशी माहिती येदीयुरप्पा यांनी दिली. या बैठकीत कर्नाटकातील भाजपाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. येदियुरप्पा यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...
17 Jul 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, May 2nd, 2021
बेळगाव, २ मे – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी निकटचे उमेदवार कॉंग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव केला. शिवसेनापुरस्कृत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार तेथे तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे येथे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यात भाजपातर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यात चुरस पाहायला मिळाली. भाजपाच्या...
2 May 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 28th, 2021
कॉंग्रेस नेते डी. शिवकुमार यांच्यावर पालकांचा आरोप, बंगळुरू, २८ मार्च – कर्नाटक सीडी प्रकरणाने रविवारी नवीन वळण घेतले असून, पीडितेच्या पालकांनी कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. शिवकुमार यांनी आपल्या मुलीचा वापर करून राज्यात घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. भाजपाचे माजी मंत्री रमेश जरकीहोळी यांनीही प्रथमच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव घेत त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला. त्यांनी राजकीय आणि...
28 Mar 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 17th, 2021
अजान, आवश्यक घोषणांसाठी वापर, बंगळुरू, १७ मार्च – कर्नाटक वक्फ बोर्डाने राज्यातील सर्व मशिदी आणि दर्ग्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर न करण्याबाबत पत्रक जारी केले आहे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. बोर्डाने हे पत्रक ९ मार्च रोजी जारी केले आहे. १९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या वक्फ बोर्डाच्या ३२७ व्या बैठकीत रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर...
17 Mar 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, December 27th, 2020
देशाची प्रतिमा सांभाळण्याचे सरकारला आवाहन, बंगळुरू, २७ डिसेंबर – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी कृषी कायद्यांना समर्थन दिले असून, एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करून पाहण्याचे आवाहन शेतकर्यांना केले आहे. तसेच, त्यांनी शेतकरी आंदोलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याचा इशाराही केंद्र सरकारला दिला आहे. कुमारस्वामी म्हणाले की, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कृषी क्षेत्राने नवीन प्रयोगासाठी तयार असले पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून...
27 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
कर्नाटक सरकारचा पुढाकार, बंगळुरू, ३ नोव्हेंबर – लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणण्याची घोषणा भाजपाशासित उत्तरप्रदेश आणि हरयाणा सरकारने केल्यानंतर आता विवाहासाठी होणार्या धर्मांतरणाविरोधात कर्नाटक सरकार कायदा तयार करणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनी मंगळवारी दिली. जिहादी तरुण, महिलांचा सन्मान हिरावून घेत असतील, तर कर्नाटक सरकार शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाच्या अनुषंगाने विवाहासाठी धर्मांतरणाविरोधात कर्नाटक सरकार कायदा आणणार आहे. अशा...
4 Nov 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 20th, 2016
म्हैसूर, [१९ मार्च] – कलेच्या सच्चा कलाकाराला कलेची साधना करत असताना मृत्यूने गाठावे याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. बासरी वाजवून रसिकांवर सुरांची मोहिनी घालणारे विख्यात बासरीवादक एव्ही प्रकाश यांचे भरमैफिलीतच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एव्ही प्रकाश यांचा म्हैसूरमधल्या चंद्रमौलेश्वर मंदिरात बासरीवादनाचा कार्यक्रम होता. बासरीवादन सुरू असताना त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते मंचावरच कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा...
20 Mar 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 15th, 2016
=भाजपाची बंदची हाक= बंगळुरू, [१४ मार्च] – विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता राजू याची रविवारी म्हैसूर येथे हत्या करण्यात आली. राजू आपल्या मित्रांबरोबर चहा पित असताना एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजूच्या मृत्यूचे वृत्त समजताच नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. भाजपाने म्हैसूर बंदचे आवाहन केले होते. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतप्त निदर्शकांनी एक ऑटो पेटवून दिला तसेच...
15 Mar 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, March 10th, 2016
बेळगाव, [९ मार्च] – संकेश्वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत हे बॉम्ब सापडल्यामुळे आश्चर्य आणि भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. काल सायंकाळी कामगारांना गाळ काढताना काही बॉम्ब आढळले. त्यांनी ही बातमी लगेच पाटील यांना दिली. पाटील यांनी तातडीने पोलिसांना याबाबत...
10 Mar 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, November 13th, 2015
=भाजपाचा सवाल, सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी= नवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] – ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुगीं यांची हत्या कर्नाटकातच झाली असताना, त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडून देशात असहिष्णुतेची स्थिती निर्माण झाल्याची ओरड करणार्या कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी विश्व हिंदू परिषदेच्या दोन नेत्यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कॉंगे्रस सरकारविरुद्ध मार्च काढून, आपल्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखविणार आहेत काय, असा संतप्त सवाल भाजपाने आज गुरुवारी केला. कलबुर्गी यांच्या हत्येशी भाजपाचा कुठलाच संबंध नसताना आणि देशात...
13 Nov 2015 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, October 18th, 2015
कर्नाटक कॉंग्रेसमधील संघर्ष उफाळला सोनिया गांधींनी बजावला समन्स नवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] – कर्नाटक कॉंगे्रसमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी अलीकडेच कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांच्या दौर्यावर गेले असता, राज्य मंत्रिमंडळातील १५ पेक्षा जास्त वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांच्या दौर्याकडे पाठ फिरविली, तर उर्वरित मंत्री व नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटविण्याची मागणी करणारे निवेदन सोपविले. या बंडाळीची गंभीर दखल घेऊन, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सिद्धरामय्या यांना समन्स बजावून दसर्यानंतर दिल्लीत...
18 Oct 2015 / No Comment /